अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे ©
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे © आपल्यापैकी बहुतेकजण हे , व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारखे कुठलातरी सोशल मिडिया वापरात असतो. आपण बघितले असेल कि सोशल मिडिया हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याच्यात्याच्या मनोवृत्तीवर ठरते. मात्र हल्ली ह्या माध्यमांवर खूप वेळा दुसऱ्या व्यक्तींबद्दल वेडे वाकडे लिहिले - बोलले जाते. आपल्याला राज्यघटनेने बोलण्याचे -अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे ह्याचा अर्थ आप वाटेल ते बोलायचे असे होत नाही. स्वातंत्र्य हे मंगेश पाडगावकर म्हणतात तसे "तुमचे आमचे सेम" असले पाहिजे. असते". आपल्याला पाहिजे तेव्हा स्वातंत्र्य आणि त्याचवेळी ते दुसऱ्याला नाही, असे "सोयीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य" करता येत नाही. सोशल मिडिया हा आता जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे आणि ह्या मिडीयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच ऐरणीवर आलेले असते आणि प्रदर्शन करायला काही धरबंधच उरत नाही. एकतर स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवनातील चांगल्या वाईट घटना "अपडेट" ...